प्रकाशदूत

चिराई ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा 

प्रकाशदूत
नामपूर : चिराई (ता. बागलाण) येथील ग्रामपंचायतीत खासदार डॉ. सुभाष भामरे यांचे खंदे समर्थक डॉ. शेषराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रगती पॅनलच्या सरपंचासह सर्व नऊ जागेवरील उमेदवार विजयी झाले आहेत. ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी गुलाल व फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला.

Published from Blogger Prime Android App

अत्यंत प्रतिष्ठेच्या व चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीचा निकाल काय लागतो याकडे संपूर्ण बागलाण तालुक्याचे लक्ष लागले होते. थेट सरपंच पदासाठी डॉ. शेषराव पाटील यांच्या मातोश्री श्रीमती शकुंतला आनंदराव पाटील यांना (८५०), तर विमलबाई साहेबराव अहिरे यांना (४०२) मते पडली. गावातील तीनही वार्ड मधील नऊ जागेवर प्रगती पॅनलचेच उमेदवार विजयी झाले आहेत.  गावाने सलग वीस वर्षापासून माझ्या वरती जो विश्वास ठेवला त्या बद्दल आगामी काळात सुध्दा गावाच्या सर्वागीण हितासाठी कटीबद्ध राहू अशी प्रतिक्रिया पॅनल प्रमुख डॉ. शेषराव पाटील यांनी व्यक्त केली.

सलग पंधरा वर्षापासून डॉ. शेषराव पाटील हे सरपंच आहेत. आता त्यांच्या मातोश्री सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत. खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या माध्यमातून गावाचा व नामपूर गटात त्यांनी अनेक विकास कामे केली आहेत. आगामी काळात नामपूर गटातून ते जिल्हा परिषदेचे उमेदवार राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Comments

Popular posts from this blog

प्रकाशदूत

प्रकाशदूत

प्रकाशदूत